Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » ‘समग्र’ अभियानातील 3,276 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | Samagra Shiksha Abhiyan Shikshak Bharti
Last Updated:

‘समग्र’ अभियानातील 3,276 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय | Samagra Shiksha Abhiyan Shikshak Bharti

Maharashtra Samagra Shiksha Abhiyan Bharti Update

Samagra Shiksha Abhiyan Shikshak Bharti : राज्यातील ‘समग्र शिक्षा अभियान’ (Samagra Shiksha Abhiyan) अंतर्गत अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या 3,276 कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

मात्र, याच अभियानात कार्यरत असलेल्या 38 कर्मचाऱ्यांचा नियमितीकरणाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समान स्वरूपाचे काम करूनही काही कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Advertisement

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?

शासन निर्णयानुसार, 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी सेवा पूर्ण केलेल्या एकूण 3,276 कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदांवर नियमित करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागातील मंजूर पदांमध्ये सामावून घेतले जाईल. नियमित झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतनश्रेणी व इतर सेवा लाभ लागू होतील. तसेच त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन, विविध भत्ते आणि इतर शासकीय सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

38 कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेत

शासनाच्या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी 38 कर्मचारी अद्याप नियमितीकरणापासून वंचित राहिले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, तेही अनेक वर्षांपासून समान जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. केवळ बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती झाल्याचे कारण देऊन त्यांना वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली असून, त्यांनाही नियमित सेवेत सामावून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री यांच्या निर्देशांनंतर निर्णय

माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी संबंधित विषयावर सकारात्मक भूमिका घेत समितीमार्फत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शासनस्तरावर विविध विभागांशी चर्चा करून अखेर नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला स्थैर्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये समाधान, तरीही काहींची नाराजी

3,276 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाचे कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या 38 कर्मचाऱ्यांनी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून सर्व पात्र कर्मचाऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

पुढे काय?

शासन निर्णयानुसार आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमित नियुक्तीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर विभागनिहाय आदेश जारी करून कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतले जाईल. दरम्यान, वगळलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासन पुढे कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राज्यात समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत एकूण ८५९ शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. ही सर्व नियुक्ती पूर्णतः कंत्राटी तत्त्वावर केली जाणार असून, नियुक्त शिक्षकांना दरमहा २०,००० रुपये निश्चित वेतन मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेत ७०० नियमित शिक्षक पदे, ३० कला प्रशिक्षक पदे आणि १२९ एनएफयूईएफ (Formal and Universal Education Facilities) शिक्षक पदांचा समावेश आहे. कला प्रशिक्षकांच्या ३० पदांमध्ये पाश्चात्य संगीतासाठी ९, ललित कलेसाठी १२ आणि नाट्यकलेसाठी ९ पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत २६ ते ३० मे २०२५ दरम्यान पर्वरी येथील शिक्षण संचालनालयात घेण्यात येणार आहे.