खुशखबर! राज्यात नोकरीच्या लाखो संधी, एक हजार रोजगार मेळावे आयोजित! – Maharashtra Rojgar melava
राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ३१ मार्च २०२७ पर्यंत एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती गरजू तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. मंत्री लोढा म्हणाले की, आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्कीलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात याची माहिती दिली जाईल. आयटीआयखेरीज इतर कॉलेजचे विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून मेळाव्याची व्यापक प्रसिद्धी करावी. प्रत्येक जिल्हा व तालुक्यात तरुणांना रोजगाराचे महत्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंमार्फत समुपदेशन केले जाईल. यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल. त्यानंतर इलेट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंगसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिले जाईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील विविध शहरातील रोजगार मेळावा या लिंकवर उपलब्ध आहेत .
तरुणांना रोजगाराचे महत्व आणि स्वरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल. पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एटीकेट (शिष्टाचार), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. मेळाव्यापूर्वी उमेदवारांना कौशल्य व पूर्वप्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक मंत्री लोढा म्हणाले की, केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व-प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण दिले जावे. उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास मेळाव्यांमधील लक्षणीयरित्या वाढेल. या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि अमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी व प्रदेश निवडीचे प्रमाण समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समन्वय समिती व विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मेळावे यशस्वी करूया. समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवून रोजगार निर्मितीची प्रक्रिया अधिक व्यापक आणि परिणामकारक बनवण्यावर भर देण्यात यावा. समितीतील सर्व सदस्यांनी या मोहिमेत सक्रीय सहभागी होऊन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊया.