पोलीस भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा बंद करा, वयोमर्यादा वाढवा, वार्षिक वेळापत्रक जाहीर करा! – Maharashtra Police Bharti updates
Maharashtra Police Bharti updates -आपल्याला माहीतच असेल, महाराष्ट्रातील हजारो युवक-युवती पोलीस भरतीची तयारी करीत आहे. मात्र, पोलीस भरती प्रक्रियेत नियमित वेळापत्रक नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो. तसेच भरती प्रक्रिया उशिराने होत असल्यामुळे अनेकांचे शैक्षणिक, आर्थिक मानसिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे (एमपीएससी) पोलीस भरतीचे दरवर्षी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या लेखी परीक्षेवर आक्षेप आहे. त्या मुले उमेदवारांची मागणी आहे कि अन्य परीक्षांप्रमाणे पोलीस भरतीचे सुद्धा वेळापत्रक असावे.
पोलीस भरतीचे निश्चित वेळापत्रक नसल्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. या माध्यमातून पोलीस भरती प्रक्रियेतील अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. करोना महामारीच्या काळात जवळपास दोन ते तीन वर्ष भरतीची प्रक्रिया नियमितपणे पार पडू शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तयारी करण्याची संधी मिळाली नाही. अनेक उमेदवार वयोमर्यादा ओलांडण्याच्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून वयोमर्यादेत योग्य ती वाढ करावी, असाही त्यांचा आग्रह आहे. सध्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक अडचणी, सर्व विद्यार्थ्यांना समान सुविधा उपलब्ध नसणे, तसेच पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस भरतीची लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन (written Exam लेखी) पद्धतीने घेण्याची मागणी युवकांनी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे पोलीस भरतीचे दरवर्षी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तयारीचे नियोजन करता येईल. करोना काळात भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष वाढ अर्थात वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस भरतीच्या ऑनलाइन पद्धतीच्या परीक्षेला तरूणांचा विरोध आहे. ही परीक्षा ऑफलाईन (Maharashtra Police Bharti updates लेखी) पद्धतीने घ्यावी, जेणेकरून परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणारी ठरेल, असे युवकांचे म्हणणे आहे. पोलीस भरती प्रक्रिया नियमित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला देण्याची मागणी युवकांनी निवेदनातून जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासनाकडे शिफारस करावी असेही आकाश सोनवणे, आकाश जाचक, मनिष बोरस्ते, नागराज गुंजाळ, प्रतिक जगताप आदींनी म्हटले आहे.